Monday, January 13, 2020

ओळी



Lines


कधीतरी सुचतात काही ओळी

पण वाटत नाही लिहाव्याशा

ओळीच त्या... 

रेंगाळत राहतात 

घुटमळतात

की वाट बघतात..? 

कोणाची.. कशाची..? 

झाली भावनांची गर्दी की 

येतात चालत आपसूक

कोऱ्या एका कागदावर 

अर्थ असतोच त्यांना असे नाही 

आणि नसतोच असेही नाही 

वाटतेच.. 

लिहावे काही 

सुखद, छान वाटणारे.. सुंदर असे काही 

पण तसे जमेलच असेही नाही.. 

ओळी शहाण्याच असतात 

वाचणाऱ्याचे मन पण वाचतात 

आणि चालतात एक वाट 

कधी सुखाची... 

कधी दुःखाची...

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...